मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आता पुन्हा वाढ होताना दिसून येत आहे. आज राज्यात ६ हजार १५९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १७ लाख ९५ हजार ९५९ इतकी झाली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ६५ मृत्यूंची नोंद झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
आज राज्यात ६ हजार १५९ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर, आज ४ हजार ८४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आता एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १६ लाख ६३ हजार ७२३ इतकी झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२. ६४ टक्के इतके झाले आहे. तर आज राज्यात एकूण ६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २. ६० टक्के इतका आहे.
[…] https://sejalmedianetwork.com/corona-update/ […]